
चालू घडामोडी 10, एप्रिल 2025 | महावीर जयंती | Mahavir Jayanti

महावीर जयंती
Mahavir Jayanti
Subject : GS - दिनविशेष, इतिहास - भारताचा प्राचीन इतिहास, जैन धर्म
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) 2025 या वर्षी महावीर जयंती केव्हा साजरी करण्यात आली ?
1. 29 मार्च
2. 2 एप्रिल
3. 6 एप्रिल
4. 10 एप्रिल
उत्तर : 10 एप्रिल
भगवान वर्धमान महावीर स्वामीं बद्दल परीक्षेसाठी IMP वनलाईनर पॉईंट्स :
• हिंदू कॅलेंडरमध्ये चैत्र महिन्याच्या 13 व्या दिवशी महावीर जयंती साजरी केली जाते, ही तारीख दरवर्षी बदलते.
• 2025 या वर्षी महावीर जयंती 10 एप्रिल रोजी साजरी करण्यात आली.
• महावीर जयंती ला महावीर जन्म कल्याणक म्हणूनही ओळखले जाते, हा जैन धर्मातील एक महत्त्वाचा धार्मिक सण आहे.
• वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे व शेवटचे तीर्थंकर होते.
स्वामी वर्धमान महावीर यांचा जन्म केव्हा आणि कोठे झाला ?
(सरळसेवा भरती, RRB Group D 2022)
• स्वामी महावीर यांचा जन्म इ.स.पूर्व 540 मध्ये बिहारमधील वैशालीजवळील कुंडग्राम येथे झाला.
• महावीराचे मूळ नांव (जन्म नाव) वर्धमान होते.
• त्यांच्या वडिलांचे नाव सिद्धार्थ आणि आईचे नाव त्रिशला होते.
• त्यांचे वडील सिद्धार्थ हे ज्ञानत्रिक क्षत्रिय कुळाचे प्रमुख होते.
• वयाच्या 30व्या वर्षी त्यांनी आपले घर सोडले आणि संन्यासी बनले.
• वर्धमान यांनी 12 वर्षे तपश्चर्या केली आणि वयाच्या 42 व्या वर्षी त्यांना कैवल्य (जैन धर्मातील सर्वोच्च अध्यात्मिक ज्ञान) प्राप्ती झाली.
• जैन धर्मानुसार कैवल्य म्हणजे सुख आणि दुःखावर विजय मिळवणे.
• वर्धमान महावीर हे जैन धर्माचे 24वे व शेवटचे तीर्थंकर होते.
• मोक्ष प्राप्ती : इ.स.पूर्व 468 मध्ये बिहारमधील पावापुरी येथे वयाच्या 72व्या वर्षी त्यांचे निधन झाले.
जैन धर्माची स्थापना कोणी केली ?
• जैन धर्माची स्थापना ऋषभ देव यांनी केली.
• ऋषभ देव यांना आदिनाथ या नावाने ही ओळखले जाते.
• ऋषभ देव हे जैन धर्माचे पहिले तीर्थंकर होते.
• जैन धर्माचे शेवटचे म्हणजेच 24 वे तीर्थंकर महावीर स्वामी हे होते.

जैन धर्मातील पंचमहाव्रते कोणती ?
जैन धर्माची पाच तत्वे कोणती ?
1. अहिंसा : सजीवांना इजा न होणे
2. सत्य : खोटे बोलू नये.
3. अस्तेय : चोरी करू नये
4. अपरिग्रह : अनावश्यक वस्तू/संपत्तीचा संचय न करणे
5. ब्रह्मचर्य
जैन धर्मातील त्रिरत्न कोणती ?
जैन धर्मात, तीन रत्ने (त्रिरत्न) दिली आहेत आणि ती निर्वाणाचा मार्ग असल्याचे म्हटले जाते.
1. सम्यक दर्शन (योग्य विश्वास)
2. सम्यक ज्ञान (योग्य ज्ञान)
3. सम्यक चरित्र (योग्य चारित्र्य/वागणूक)