
चालू घडामोडी | भैरव बटालियन

Bhairav Battalion
Subject : GS - संरक्षण (Defence)
सरळसेवा, रेल्वे, तलाठी, वनरक्षक, पोलीस भरती, अग्निवीर , SSC GD, MPSC, UPSC परीक्षेसाठी विचारलेले / संभाव्य महत्त्वपूर्ण प्रश्न
प्रश्न) भारतीय सेनेची ‘भैरव बटालियन’ कोणत्या प्रकारच्या युद्धासाठी विशेषतः तयार करण्यात आली आहे ?
1. सागरी युद्ध
2. पारंपरिक पायदळ युद्ध
3. केवळ दहशतवादविरोधी अभियान
4. संकरित युद्ध व जलद कारवाई
उत्तर : संकरित युद्ध (Hybrid Warfare) व जलद कारवाई
बातमी काय ?
• भारतीय सेनेने अलीकडेच उभारलेल्या भैरव बटालियन या नव्या लढाऊ तुकड्यांचा पहिला सार्वजनिक सहभाग जयपूर येथे होणाऱ्या आर्मी डे परेडमध्ये दिसणार आहे.

भैरव बटालियन म्हणजे काय ?
• भैरव बटालियन ही भारतीय सेनेची नव्या पिढीची जलद आक्रमक लढाऊ तुकडी आहे.
• ही बटालियन सीमेवरील तातडीच्या आणि तंत्रज्ञानाधारित लष्करी कारवाईसाठी भारतीय सेनेच्या नव्या संरचनेचा भाग आहे.
भैरव बटालियन मुख्य उद्देश कोणता ?
👉 या बटालियनचा मुख्य उद्देश -
• पॅरा स्पेशल फोर्सेस आणि नियमित पायदळ यांच्यातील अंतर भरून काढणे.
• कमांडरकडे “आजच लढा देऊ शकणारी” (Fight-Tonight) तुकडी उपलब्ध करून देणे हा आहे.
भैरव बटालियन का आवश्यक आहे ?
👉 आजच्या काळातील धोके फक्त पारंपरिक युद्धापुरते मर्यादित नसून त्यामध्ये -
• ड्रोन हल्ले
• इलेक्ट्रॉनिक व्यत्यय
• ग्रे-झोन धमक्या
• सीमावर्ती जलद चकमकी - यांचा समावेश होतो.
👉 अशा परिस्थितीत मोठ्या युनिट्सऐवजी लहान, चपळ आणि तंत्रज्ञान-सज्ज तुकड्या अधिक प्रभावी ठरतात.
👉 याच गरजेतून भैरव बटालियन संकल्पना पुढे आली.
भैरव बटालियनची रचना व वैशिष्ट्ये :
• भैरव बटालियनमध्ये साधारण 200 ते 250 अत्यंत प्रशिक्षित सैनिक असतात.
➡️ ही तुकडी -
- ड्रोन युद्ध
- टेहळणी व गुप्त माहिती संकलन
- इलेक्ट्रॉनिक व्यत्यय
- जलद आणि अचूक हल्ले - यामध्ये विशेष प्राविण्य ठेवते.
✍️ ही बटालियन जमिनीवरील कारवाई, मानवरहित प्रणाली आणि सायबर-इलेक्ट्रॉनिक सहाय्य यांचे संमिश्र रूप म्हणजेच संकरित युद्ध (Hybrid Warfare) लढण्यासाठी तयार करण्यात आली आहे.

तैनाती व कार्यक्षेत्र :
• भैरव बटालियन भारतीय सेनेच्या कोअर आणि डिव्हिजन स्तरावरील संरचनेखाली कार्यरत असते.
• या बटालियन प्रामुख्याने -
- राजस्थान सीमेवर
- जम्मू-काश्मीर
- लडाख
- ईशान्य भारत -
या संवेदनशील सीमावर्ती भागांत आधीच तैनात ठेवल्या जातात.
• जेणेकरून कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवताच तात्काळ प्रतिसाद देता येईल.
भैरव बटालियनचे संरक्षण धोरणाच्या दृष्टीने महत्त्व :
👉 भैरव बटालियनमुळे भारतीय सेनेची -
• सीमावर्ती संकटांना तात्काळ प्रतिक्रिया देण्याची क्षमता वाढते.
• अचूक, वेगवान आणि तंत्रज्ञानाधारित कारवाई शक्य होते.
• तसेच, ही बटालियन रुद्र ब्रिगेड्स आणि मानवरहित युद्ध तुकड्यांबरोबर भारतीय सेनेच्या पुनर्रचना व आधुनिकीकरण धोरणाचा महत्त्वाचा आधारस्तंभ आहे.
🔑 परीक्षेच्या दृष्टीने IMP रिव्हिजन पॉईंट्स :
• भैरव बटालियन = भारतीय सेनेची नव्या पिढीची जलद लढाऊ तुकडी
• युद्ध प्रकार = संकरित युद्ध (Hybrid Warfare)
• सैनिक संख्या = सुमारे 200–250
• भूमिका = जलद छापे, ड्रोन युद्ध, टेहळणी, इलेक्ट्रॉनिक व्यत्यय
• तैनाती = सीमावर्ती संवेदनशील भाग
• उद्देश = Para SF आणि नियमित पायदळातील अंतर भरून काढणे
• महत्त्व = तात्काळ प्रतिसाद + तंत्रज्ञानाधारित कारवाई




