रॅाच्या प्रमुखपदी सर रवी सिन्हा
वरिष्ठ IPS अधिकारी रवी सिन्हा सर यांची रॅाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
दोन वर्षांसाठी ते हा पदभार सांभाळतील.
ऑपरेशन मॅन म्हणून प्रसिद्ध असलेले रवी सिन्हा सर यापूर्वी रॅाच्या ऑपरेशन विभागाचे प्रमुख होते.
RAW - Research and Analysis Wing
संशोधन आणि विश्लेषण विभाग
स्थापना : 21 सप्टेंबर 1968
मुख्यालय : नवी दिल्ली
बोधवाक्य : धर्म रक्षति रक्षित:
‣ 1962 च्या भारत - चीन आणि 1965 च्या भारत - पाकिस्तान युद्धानंतर देशासाठी आंतरराष्ट्रीय गुप्तचर बाबी हाताळण्यासाठी एक वेगळी आणि समर्पित संस्थेची गरज भासू लागली यातून रॅाचा जन्म झाला.
‣ तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी आर. एन. काओ यांना रॅाचे पहिले सचिव म्हणून नियुक्त केले.
‣ कार्य : भारताची विदेशी गुप्तचर संस्था म्हणून काम करणे, गुप्तचर माहिती गोळा करणे, दहशतवादी घटनांवर लक्ष ठेवणे इत्यादी.
___________________________________
पंतप्रधानांनी राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केला
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेशातील शहडोल येथे राष्ट्रीय सिकलसेल ऍनिमिया निर्मूलन मोहिमेचा शुभारंभ केला.
• कार्यक्रमात त्यांनी लाभार्थ्यांना सिकलसेल जनुकीय स्थिती कार्डचे वाटप केले.
सिकल सेल पेशी रक्तक्षय म्हणजे काय ?
• हा लाल रक्तपेशींचा अनुवंशिक विकार आहे.
• हा विकार शरीराच्या सर्व भागांना ऑक्सिजन पुरवणाऱ्या प्रथिनांवर म्हणजेच हिमोग्लोबिनवर परिणाम करतो.
• यामुळे वृद्धांमध्ये लाल रक्तपेशी चंद्रकोर किंवा सिकल (विळ्यासारख्या) आकाराच्या होतात.
परिणाम आणि लक्षणे :
• याविकारामुळे शरीराच्या वेगवेगळ्या भागात रक्त पोहोचवण्यास अडथळा निर्माण होतो.
• सिकल लाल पेशी अकाली तुटल्यामुळे रक्तक्षय, अशक्तपणा, श्वास घेण्यास त्रास, मंदवाढ व विकार असा त्रास होऊ शकतो.
• कालांतराने फुफ्फुसे, मूत्रपिंड, मेंदू अशा अवयवांची हानी होते आणि स्ट्रोक उद्भवतो.
उपचार : या आजाराचा एकमेव उपचार म्हणजे बोनमॅरो किंवा स्टेमसेल ट्रान्सप्लांटेशन ( प्रत्यारोपण).
___________________________________
स्वामी विवेकानंद
स्वामी विवेकानंदांची आज पुण्यतिथी (4 जुलै )
त्यांना शतशः नमन करून जाणून घेऊया परीक्षेच्या दृष्टीने त्यांचा जीवनप्रवास
स्वामी विवेकानंद (1863 - 1902)
जन्म : 12 जानेवारी 1863 (राष्ट्रीय युवा दिवस)
जन्मस्थळ : सिमलापल्ली, कोलकत्ता
मूळ नाव : नरेंद्रनाथ दत्त
गुरु : स्वामी रामकृष्ण परमहंस
‣ स्वामी विवेकानंदांनी पाश्चात्य शिक्षण आणि हिंदू धर्म यांची योग्य सांगड घालून आत्मसिद्धीचा मार्ग म्हणजे इतरांना मदत करणे हा संदेश जगाला दिला.
‣ त्यांनी लोकांना नि: स्वार्थ सेवेतून समाजाच्या भल्यासाठी कार्य करण्यास प्रेरित केले.
‣ 1893 मध्ये शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेमध्ये हिंदू धर्माची श्रेष्ठता व उदारता सर्वांना पटवून देण्यासाठी प्रयत्न केले.याचे फलित म्हणून अनेक विदेशी अनुयायी त्यांस लाभले. उदाहरणार्थ कु. मार्गारिट नोबल या पुढे भगिनी निवेदिता म्हणून प्रसिद्धीस आल्या.
रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशन :
स्थापना : 1 मे 1897
मुख्यालय : बेलूर मठ , कोलकत्ता
‣ आपले गुरु रामकृष्ण परमहंस यांची शिकवण समाजापर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी रामकृष्ण मठ व रामकृष्ण मिशनची स्थापना केली.
‣ जगातील सर्वच धर्म सत्य असून ते एकाच ध्येयाप्रत जाण्याचे वेगवेगळे मार्ग आहेत अशी रामकृष्ण मिशनची शिकवण होती.
समाजसेवेचे कार्य :
‣ धार्मिक सुधारणांबरोबर सामाजिक सुधारण्याचीही कार्ये रामकृष्ण मिशननी केली.
‣ ठिकठिकाणी अनाथाश्रमे, रुग्णालये, विश्रामगृहे यांची स्थापना केली गेली.
‣ नैसर्गिक आपत्तीच्या काळात संकटग्रस्तांना मदतीचा हात देऊन माणुसकी हाच खरा धर्म आहे ही शिकवण जगाला दिली.
___________________________________
कुई भाषा
ओडिशा मंत्रिमंडळाने कुई भाषेचा समावेश भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये करण्याच्या प्रस्तावाची शिफारस केली.
याचा फायदा 7 लाखाहून अधिक लोकांना होणार असल्याचा ओडिशा सरकारने म्हटले आहे.
कुई भाषेबद्दल थोडक्यात माहिती :
• ही कंधा समुदायाद्वारे बोलली जाणारी आग्नेय भागातील द्रविड भाषा आहे.
• ही प्रामुख्याने ओडिशा राज्यात बोलली जाते.
• कांध, खोंड, खोंडी, खोंडो या नावानेही ही भाषा ओळखली जाते.
• कुई भाषा ओडिया लिपीमध्ये लिहिली जाते.
भारतीय राज्यघटनेची 8 वी अनुसूची नेमकी काय आहे ?
• 8 व्या अनुसूचित अधिकृतित भाषांची यादी आहे.
• एकूण 22 भाषांना अधिकृत भाषा ( Schedule Language ) म्हणून मान्यता देण्यात आली आहे.
• त्या खालील प्रमाणे आहे :
‣ संस्कृत, काश्मिरी, कोकणी, मराठी, गुजराती, सिंधी, तेलगू, तमिळ, मल्याळम, कन्नड, मणिपुरी, मैथिली, हिंदी, पंजाबी, आसामी, बंगाली, नेपाली, ओडिया, उर्दू, बोडो, डोंगरी, संथाली.
___________________________________
गुरु पौर्णिमा
• हिंदू, जैन आणि बौद्ध या तीनही धर्मात गुरुपौर्णिमेला महत्त्वाचे स्थान आहे.
• गुरूप्रती आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणारा हा दिवस.
• दरवर्षी आषाढ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.
व्यास पौर्णिमा :
‣ महर्षी वेद व्यासजींचा जन्म आषाढ पौर्णिमेला झाला होता म्हणून गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा, वेदव्यास जयंती असेही म्हणतात.
‣ महर्षी वेद व्यासजींनी मानव जातीला प्रथमच वेदांचे ज्ञान दिले म्हणून त्यांना मानव जातीचे पहिले गुरु देखील मानले जाते.
बौद्ध पौर्णिमा :
‣ ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर गौतम बुद्धांनी सारनाथ येथे पहिल्यांदा पाच भिक्षूंना धर्मोपदेश दिला.
‣ हा दिवस आषाढ पौर्णिमेचा होता त्यामुळे हा दिवस बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो.
भारताबरोबर नेपाळ, भूतान, कंबोडिया, थायलंड, श्रीलंका, लाओस, म्यानमार इत्यादी देशांमध्येही मोठ्या उत्साहाने गुरुपौर्णिमा साजरी केली जाते.